कृष्णाजी केशव कोल्हटकर यांचा ‘भारतीय मानसशास्त्र अर्थात पातंजल योगदर्शन’ या ग्रंथात
गण गण गणात बोते हे गीतेतील (३.२८) श्लोकाचे रूपक आहे -->
गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते
गीतेतील (३.२८) श्लोक
तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः।
गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते।।3.28।।
पण हे महाबाहो (अर्जुना), गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे तत्त्व जाणणारा ज्ञानयोगी सर्व गुणच गुणांत वावरत असतात, हे लक्षात घेऊन त्यांमध्ये आसक्त होत नाही. ॥ ३-२८ ॥
कृष्णाजी केशव कोल्हटकर यांचा ‘भारतीय मानसशास्त्र अर्थात पातंजल योगदर्शन’ हा ग्रंथ व विशेषत: त्यातील साधनपाद आणि विभूतीपाद ही प्रकरणे अवश्य वाचावीत. तर धारणा, ध्यान आणि समाधीची व्याख्या काय? ‘देशबन्धश्चित्तस्य धारणा’ अर्थात चित्ताला एकदेशी, एका दशेत, एका स्थानावर बांधून टाकल्यागत स्थिर करणे म्हणजे धारणा. ज्या स्थानावर, विषयावर साधकाला स्थिर व्हायचं आहे तो परमात्माच आहे. शाश्वत आहे. तेव्हा धारणा म्हणजे जो शाश्वत असा परमात्मा त्याची धारणा. ‘तत्र प्रत्ययैकतानता धानम्’ म्हणजे ही धारणा क्षणभर टिकणारी असता कामा नये. परमात्मभावनेची धारणा क्षणोक्षणी टिकणे, परमात्मप्रत्ययाची एकतानता होणे म्हणजे ध्यान. ‘तदेवार्थमात्रनिर्भासं स्वरूपशून्यमिव समाधि:’ अर्थात ध्येय अशा, भाव्य अशा परमात्म्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही अर्थ भासमान न होता केवळ तो भाव्य परमात्माच भासमान होणे. चित्त भाव्य परमात्म्याशी इतके तन्मय होणे की परमात्म्याचे मी ध्यान ‘करीत’ आहे, अशी सूक्ष्मदेखील जाणीव न होणे. मग तर ध्येय परमात्मा, त्या परमात्म्याचे ध्यान आणि ध्याता साधक जणू एकजीव होऊन जाणे हीच समाधी!
कृष्णाजी केशव कोल्हटकर यांचा ‘भारतीय मानसशास्त्र अर्थात पातंजल योगदर्शन’ या ग्रंथाने कोल्हटकरांना प्रसिद्धी मिळाली. भारत सरकार, महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि अनेक सार्वजनिक संस्थांकडून त्यांचा गौरव झाला. पुणे विद्यापीठाने त्यांना ९ जुलै १९७२ रोजी डॉक्टर ऑफ लिटरेचर ही मानद पदवी प्रदान केली.
No comments:
Post a Comment